Saturday, April 20, 2024
HomeIndiaशेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी परिशिष्ट (९ )रद्द करा पंतप्रधान मोदींना निवेदन

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी परिशिष्ट (९ )रद्द करा पंतप्रधान मोदींना निवेदन


अन्यथा राज्यात बहुजन जनता दल आंदोलन करणार पंडितभाऊ दाभाडे


पुणे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मुळ भारतीय संविधानात नसल्यामुळे आणि तत्कालीन हंगामी केंद्र सरकारने जमिनदारी नष्ट करण्यासाठी या गोंडस नावाखाली १८ जुन १९५१ रोजी भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेल्या परिशिष्ट (९) रद्द करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले.


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या संविधानात शेतकऱ्यांचे आणि जनतेचे सर्व मुलभूत अधिकार सुरक्षित होते मात्र १८ जून १९५१ रोजी तत्कालीन केंद्र सरकारने भारताच्या संविधानात पहिलीच घटना दुरूस्ती करून (कलम ३१ बी) निर्माण करून त्यात परिशिष्ट (९)चा समावेश करण्यात आला, परिशिष्ट (९) मध्ये समाविष्ट कायद्याच्या विरोधात देशाच्या कोणत्याही न्यायालयात शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय मागण्यासाठी तरतूद नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या मुलभूत अधिकार हिरावून घेण्यात आला,
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि मुलभूत अधिकारासाठी देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी तात्काळ घटना दुरूस्ती करून परिशिष्ट (९) रद्द करावे अशी मागणी बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे,
‌. मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा राज्यात बहुजन जनता दल उग्र आंदोलन करणार असा इशाराही पंडितभाऊ दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular