36 वर्षा पासून कंपनी करीत आहे आदिवासी वर अत्याचार. गडचांदूर .मो.रफिक शेख. गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनी ती आता अल्ट्राटेक सिमेंट कंपनी झाली आहे.
कंपनीवर कूसुंबी येथील आदिवासी याच्यावर अन्याय केल्याने शेवटी 36 वर्षा पासून होत असलेल्या अत्याचार विरोधात माणिकगड सिमेंट कंपनी व जिल्हा प्रशासन अन्याय अत्याचार करीत आहे.नुकताच चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी बोगस अहवाल शासनाला सादर केला आहे. नुकतेच दबंग पटवारी मोहन खोब्रागडे व सामाजिक कार्यकर्ते भारत भाऊ आत्राम यांनी माहिती चे अधिकारात ही माहिती मिळताच.तात्काळ पीडित चोवीस आदिवासी बांधवांना घेऊन उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. यात कंपनी व आतापर्यंत चे जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी याचेवर फौजदारी गुन्हे अक्त्ट्रासिटी कलम 3-1-5 नुसार दाखल करावी तसेच शेती मोबदला 25 लाख प्रती एकर नुकसान भरपाई,नोकरी, 36 वर्षा पासून चा मोबदला ची मागणी दबंग तलाठी मोहन खोब्रागडे व भारत आत्राम यांनी क्रिमिनल पीटिशन उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे शासन विभागात खूप मोठी खळबळ माजली आहे.तर न्यायालयाच्या आदेश कडे जनतेचे लक्ष लागले आहे.