वर्धा : घराजवळील असलेल्या नाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज होणाऱ्या डासांच्या त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी एका व्यक्तीने थेट खासदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्णय आर्वी येथील एका व्यक्तीने घेतला आहे.
सामान्य माणसांचे प्रश्न आणि वेगवेगळ्या समस्या निवडणूकीचे मुद्दे ठरतात. पण महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात गांधींच्या वेशभूषेत लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी चक्क गांधींच्या वेशभूषेत आर्वीचा गांधी म्हणून ओळख असलेला प्रकाश उर्फ टिटू मोटवानी यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज विकत घेण्यासाठी आलेल्या या प्रतीकत्मक गांधीने सर्वांचे लक्ष वेधले