Tuesday, December 5, 2023
No menu items!
Home भंडारा गणेशपुर येथे जनावरांच्या कोट्याला लागली आग

गणेशपुर येथे जनावरांच्या कोट्याला लागली आग

भंडारा :
शहराजवळ असलेल्या गणेशपुर येथील हरिराम मेहर यांच्या गोठ्याला व घराला अचानक आग लागली. त्यात सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. मात्र २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.


घटनेची माहिती भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पवन मस्के यांना होताच घटनेची माहिती जनसेवक पवन मस्के यांनी अग्निशामक दल, पोलीस विभाग व विद्युत कर्मचाऱ्यांना दिली. तर गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असतांना अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या व अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र हरिराम मेहर यांचे मोठे झाले आहे. जनावरांसाठी ठेवलेली तणस आगीत जळून खाक झाली आहे. त्यात २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हरिराम मेहर यांच्या समोर पडला आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने मेहर यांना आर्थिक मदत देण्याची मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पवन मस्के यांनी केली आहे.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

साकोलीत पुन्हा घरफोडी, दोन लाखांचे रोख व ऐवज लंपास

भंडारा : बंद घर फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना...

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

• लाखनी येथील घटना• साश्रू नयनांनी अंत्यसंस्कारलाखनी : इयत्ता बारावीच्या...

भंडाऱ्यात अनेक भागात नळाला अपुरा व दूषित पाणी पुरवठा

*नगर परिषदेचे कोणतेही नियंत्रण नाहीभंडारा : शहरात अनेक वर्षांपा सून...

Most Popular

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021