Saturday, July 27, 2024
Homeचंद्रपुरपशुपक्षांचे सरंक्षण ही काळाची गरज

पशुपक्षांचे सरंक्षण ही काळाची गरज

ब्रम्हपुरी : वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे . त्यांनाही मानवाप्रमाणे जिवन जगण्याचा अधिकार आहे देशाला आपल्या वनसंपदेवर अभिमान आहे . पशुपक्ष्यांची अनेकदुर्लभ जाती आमच्या समृध्द वनात आहेत .

परंतु भारता सारख्या निसर्ग उपासक देशात काही क्रुर व लालची प्रवृत्तीच्या मनुष्यांमुळे निर्जिव व मुक्या पशुपक्षांची शिकार अनेक वर्षापासून सुरू असून त्यांच्या सुंदर जाती काळानुसार नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही . रंगीबेरंगी पक्षांची , पशुंची शिकार फासे पारधी व शिकारी करीत असून ते बाजारात विकायला आणतात . भाजून खातात . मुक्या पशु पक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे . कावळे , चिमण्या , गिधाड यासारखे पक्षी दिसेनासे झाले आहेत . वेळीच न सावरल्यास भविष्यात नैसर्गिक आपत्ती, महासंकटाशी सामोरे जावे लागन्याची शक्यता नाकारता येत नाही .....

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular