वर्धा : 2020 च्या खरीप हंगामात घेण्यात आलेल्या सोयाबिन बियाण्याची बिजोत्पदानाची प्रत अति पावसामुळे खराब झाली. तसेच उत्पादकताही बरीच कमी आल्यामुळे खरीप 2021 च्या हंगामाकरीता राज्यास लागणा-या सोयाबिन बियाणे उपलब्ध होण्याचे दृष्टीने महाबिज शासनाच्या निर्देशानुसार उन्हाळी 2020-21 हंगामासाठी जिल्हयात लागणा-या सोयाबिन बियाण्याकरीता प्रायोगिक तत्वावर सोयाबिन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ज्या शेतक-यांकडे ओलिताची सोय आहे. व जे शेतकरी उन्हाळी हंगामात सोयाबिन बिजोत्पादन कार्यक्रम घेऊ इच्छितात अशा शेतक-यांनी महाबिजच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्या 8669642784 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाबिजचे विभागीय व्यवस्थापक व्ही.सी. पाटील यांनी केले आहे.
सोयाबिनचे बिजोत्पादन कार्यक्रम घेऊ ईच्छिणा-या शेतक-यांनी बिजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी करावी. उन्हाळी हंगामात सोयाबिन बिजोत्पादन कार्यक्रमाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवाडयापर्यंत केल्यास अधिक फायदेशिर ठरेल त्यामुळे ईच्छुक बिजोत्पादक शेतक-यांनी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यानी महाबिज कार्यालयाशी संपर्क साधावा. असे महाविज कार्यालयाने कळविले आहे.