वर्धा ; केंद्रातील मोदी सरकार हुकुमशाही आणण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. शेतकरी आंदोलन हे भारतीय राज्यघटनेचे आंदोलन आहे. शेतकरी थोड्या मागणीसाठी एवढा मोठा संघर्ष करीत आहे. शेतकरी आंदोलनाची चुकीच्या पद्धतीने बदनामी करण्याचे काम मोदी शहाचे केंद्र सरकार करीत आहे. अशी घणाघाती टीका शेतकरी नेत्यांनी वर्ध्यातील बजाज चोकात शेतकरी कामगार समन्वय समितीने आयोजित शेतकरी सभेत केली .
आजच्या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चाचे श्रीकांत तराळ , महा संयुक्त मोर्चाचे अध्यक्ष संदीप गिट्टे पाटील, पंजाब प्रांतातील नेते अमनदिपसिंह घुम्मत, हरियाणा भारतीय किसान आंदोलनचे प्रवक्ता तेजवीर सिंग, उत्तर प्रदेशचे किसान नेते गुरुअमनीतसिंह मांगत, गुरुद्वारा प्रमुख गुरूविंदरसिंग , रविंदरसिंग, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे,किसान अधिकार अभियानाचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना शेतकरी नेते म्हणाले की,आपली शेतकरी 😊लढाई लांबवर चालणार आहे. आपल्याला महात्मा गांधी व सरदार भगतसिंग या दोघांचे तत्वज्ञान एकत्र आणून काम करणे आवश्यक आहे. देशाला शहिदांची आवश्यकता भागणार आहे.असे ते म्हणाले .
केंद्र सरकारने हा कार्यक्रम होऊ नये, व राकेशजी टिकैत यांची सभा रद्द करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. केंद्र सरकार जनतेसोबत कोरोनाचे नाव करून पोलिस प्रशासन व प्रशासन मार्फत रडीचा डाव खेळून आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमाचे संचालन किसान सभेचे यशवंत झाडे यांनी केले. आभार किसान अधिकार अभियान चे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी मानले .
संजय भगत,असलम पठाण, पूजा जाधव, प्रा. सूचीता ठाकरे, विद्याताई राईकवार, ललिता कुकडे, श्रेया गोडे यांनी परिवर्तनाची गीते सादर केली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आंदोलन समन्वय समीतीने सामुहिक हार टाकून केले .
या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील चाळीस पेक्षा जास्त संघटनांचे शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.