महिलांनी रमाई आंबेडकराचे आदर्श आत्मसात करावे – रतिश्री ताकसांडे.
हिंगणघाट : –
आदर्श नगर जीवक बुद्ध विहार, हिंगणघाट येथे रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंती निमित्त व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चना झाडे , प्रमुख वक्त्या रतीश्रीत ताकसांडे, प्रमुख उपस्थिती गौतमा यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन रतीश्री ताकसाडे यांनी माता रमाई बद्दलचे विचार मांडले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणाकरीता अर्चना झाडे यांनी “रमाई आंबेडकरी चळवळीच्या प्रेरणास्रोत,” याविषयावर व्याख्यान दिले.
कार्यकर्माचे सूत्रसंचालन पूनम गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता जीवक बुद्ध विहार आदर्श नगर,महीला,पुरुष व युवा मंच यांनी परिश्रम घेतले.