वर्धा : महात्मा गांधीजी च्या संकल्पनेतील गाव स्वावलंबनाची सुरुवात छत्तीसगड राज्यात सुरू केली आहे गांधी 150 वर्षांपासून ग्रामस्वराज्य (नरवा गरवा कुआ पाणी) सुरु केलेली आहे . देशातील पहिले राज्य आहे . गाईचे शेण खरेदी करून त्यातून जैविक शेती करण्याचे काम करीत आहे .असे माहिती छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सेवाग्राम आश्रमात बापू कुटी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
छत्तीसगड काँग्रेस पक्षाची तीन दिवशीय बैठक सेवाग्राम येथील शांती भवन येथे आयोजित करण्यात आली आहे .या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आज दुपारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आले होते .
यावेळी बोलताना म्हणाले ,माझ्या परिवार सर्वोदयी असल्याने मला गांधीजी आणि इथली माहिती आहे.महात्मा गांधीजी यांची 150 वी जयंती वर्षांत छत्तीसगड मध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.
महात्मा गांधींजीच्या गाव स्वावलंबन संकल्पनेने महिलांना आणि पुरुषांना स्वावलंब व रोजगार निर्मिती करण्यासाठी गाईचे शेण 2 रुपये दराने विकत घेऊन त्याचे वर्मी कंपोस्ट खत तयार करण्याचे काम करीत आहे ते कम्पोस्ट खत 10 रुपये किलो दराने विकल्या जात आहे . त्यासोबत भाजी उत्पादन,शेळी पालन,कुकुट पालन,मत्स्य पालन,गो दुग्ध उत्पादन आदी स्वयंरोजगार राबविल्या जात आहे.
छत्तीसगड मधील नक्षलवाद कमी झाला आहे. तेथील नागरिकांच्या विचारात बदल करण्या सोबत गावाचा विकास केल्या जात आहे .हिंसावादी अहिंसेचा मार्ग पत्करत आहे .असेही चंदेल म्हणाले .
पुढे बोलताना म्हणाले, दिल्ली येथे शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करित आहे .ज्या शेतकऱ्यांसाठी कायदा केला ते त्यांना मंजूर नसल्याने केंद्र सरकारने कायदा परत घ्यावा.हा कायदा भांडवलदार वर्गाच्या हिताचा आहे .केंद्र सरकारने खाजगिकरणाचा सपाटा सुरू केला आहे विमा ,रेल्वे ,विमान आदी सेवांचे खाजगीकरण करीत असताना आता शेती भांडवलदारांकडे देण्याचा डाव आखत आहे. मात्र शेतकरी जागृत झाला आहे .
कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीच होणार असेही भुपेश चंदेल म्हणाले .
सेवाग्राम आश्रमात बापू कुटीचे दर्शन घेऊन प्रार्थना करण्यात आली. बापूकुटी परिसरातील राजीव गांधी,राहुल गांधी यांनी लावलेल्या वृक्षाला पाणीही भुपेश बघेल यांच्या हस्ते देण्यात आले .
यावेळी छत्तीसगड काँग्रेस प्रदेशाध्याक्ष मोहन मरकाम,प्रदीप शर्मा, राजगोपाल अग्रवाल, विनोद शर्मा आदीची उपस्थिती होती.