Saturday, April 20, 2024
Homeवर्धाकेंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधातील मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील किसान...

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधातील मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील किसान सभेचे 100 कार्यकर्ते आज रवाना झाले .

बजाज चौक येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन मंडपातून महाराष्ट्र राज्य किसान सभा (सिटू) चे वर्धा जिल्ह्यातील 100 कार्यकर्ते महिला व पुरुष दोन ट्रैव्हल्स करून मुंबई च्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.

आंदोलन मंडपात किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी या ट्रैवल्सला तिरंगा झेंडा दाखवून मोर्चा मुंबई कडे रवाना करण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव यशवंत झाडे व माकपचे जिल्हा सचिव सीताराम लोहकरे,सिटूचे जिल्हा सचिव भैयाजी देशकर करीत आहेत.

मुंबईला राज्यभरातील लाखो कार्यकर्ते मुंबई च्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व किसान सभा करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular