पावसाळा सुरू होण्यापूर्वी या वर्षात तरी पूर्ण होईल का?
आर्वी : तळेगाव – आर्वी रोड व आर्वी- पुलगाव रोडची परिस्थिती पाहता रोड खोदून ठेवल्याने
नागरिकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तीन वर्षांपासून काम सुरु आहे. तरीही अजून काम अर्ध्या पेक्षाही कमीच झाल्याचे दिसून येत आहे.
येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी रस्त्यावर चालताना स्वतःची व परिवाराची मोठी काळजी घ्यावी लागत आहे. तसेच रोडवर झालेल्या चिखलामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सायकल व दुचाकीने जाणे-येणे करणाऱ्या नागरिकांना समोरून येणाऱ्या मोठ्या गाडीचे लाईट डोळ्यावर येत असल्याने खड्ड्यांमुळे तोल जात असल्याचे दिसून येत आहे.
खोदून ठेवलेल्या रोडचे काम आता तरी लवकर पूर्ण होईल का? असा प्रश्न नागरिकांकडून होत आहे. कारण प्रशासन आपली जबाबदारी एकदुसर्यावर ढकलत असल्याने आर्वीकरांना येत्या काळात या खोदून ठेवलेल्या रोडमुळे जीव गमावावा लागू शकतो अशा परिस्थितीत रोडचे काम लवकरात लवकर करण्याचे प्रशासनाला नागरिकांकडून होत आहे. वारंवार मागणी