Friday, March 29, 2024
Homeवर्धाआर्वीच्या गल्ली बोळीत वाढले कचऱ्याचे ढिगारे

आर्वीच्या गल्ली बोळीत वाढले कचऱ्याचे ढिगारे

आर्वी : येथील नगर पालिकेच्या अध्यक्षांच्या परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे लागले आहे .त्यामुळे परिसरातील नागरिकांना अस्वच्यात आणि आरोग्य धोक्यात आले आहे .त्यामुळे नागरिकांमध्ये नागरपालिके विषयी रोष निर्माण झाला आहे.

वल्लीसाहेब वार्ड, येथील नगर पालिकेचे अध्यक्ष प्रशांतजी सव्वालाखे यांच्या घरा मागच्या गल्लीत कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. वारंवार सांगूनही नगरपरिषद साफसफाई कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे. फक्त रोडवरची साफसफाई करतात व गल्ली बोळीत डोकावूनही पाहत नाही. त्यामुळे गल्ली बोळीत कचऱ्याचे प्रत्येक ठिकाणी ढीग जमा झालेला दिसत आहे. त्या गल्लीला लागूनच दवाखाने व मेडिकल असल्यामुळे तेहि कचरा त्याच गल्लीत आनून टाकतात. त्यामध्ये निकामी झालेली इंजेक्शन सलाईनचा समावेश असतो. या गल्लीत डस्टबिन नसल्यामुळे तेही कचरा खालीच टाकतात गल्लीतल्या साफसफाई होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगराध्यक्ष यांच्याच पाठीमागच्या गल्लीचे साफसफाई होत नाही. तर दुसऱ्या गल्ल्या केव्हा साफ होईल असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासानी गल्लीत कचराकुंडीची मागणी करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular