Ø 25 मार्च पर्यत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली
वर्धा : माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोक सम्पर्क ब्युरो, पुणे आणि क्षेत्रीय लोक सम्पर्क ब्यूरो, वर्धा व स्थानिक प्रशासनच्या संयुक्त विद्यामाने ने आज सेवाग्राम चरखागृह येथे आझादी का अमृत महोत्सव प्रदर्शनीचे उद्घाटन वर्धा नगरपरिषदेचे अध्यक्ष अतुल तराळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा अधिकारी अशोक लटारे जिल्हा नियोजन अधिकारी अरविन्द टेभुर्णे, क्षेत्रिय प्रचार अधिकारी बी. पी. रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत सरकार द्वारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या माध्यमाने स्वातंत्र्य संग्रामच्या 75 वर्षगाठ देशभरात साजरी करण्यात येत आहे. या अनुषगाने आज चरखागृह तेथे या प्रदर्शनिचा शुभारंभ करण्यात आला. ही प्रदर्शनी नागरिकांना पाहण्या करीता 22 ते 25 मार्च पर्यंत, सकाळी 11-00 वाजता पासून सायकाळी 09-00 पर्यंत सुरु राहिल . ह्या प्रदर्शनिच्या माध्यमातून नागरिकांना महात्मा गाँधी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्या सोबतच अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या संबधात माहिती प्राप्त होईल.
संदर्भात प्रदर्शनी पाहण्याकरीता कोविड नियमाचे पालन करने आवश्यक आहे . त्यामुळे मास घालने, सेनिटाझचा वापर करने, सामाजिक अंतर पाळणेची आदी गोष्टीचे पालन करून प्रदर्शनी पाहण्यासाठी प्रवेश मिळेल.