राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीची मागणी
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील साखर कारखाना बंद आहे. सदर कारखाना सुरु करावा अशी मागणी जिल्हा राकांपा विजा सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश चव्हाण यांनी केली आहे. या बाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
मागील 10 ते 15 वर्षां पासून बोदेगाव येथील साखर कारखाना बंद आहे. यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असून सुद्धा साखर कारखाना बंद आहे. बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे. शेतकरी शेतमजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कारखाना सुरु करावा अशी मागणी केली आहे. यावेळी दिग्रस तालुका अध्यक्ष प्यारेलाल सगने, यवतमाळ तालुका उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, घाटंजी तालुका उपाध्यक्ष कैलाश राठोड उपस्थित होते.