भंडारा :
भंडारा: जिल्ह्यात मागील वर्षी आलेल्या महापुरात शासकीय गोदामातील असलेले हजारो क्विंटल धान्य खराब झाले आहे. या धान्याला आता दुर्गंधी सूटली असून एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी झालेल्या या धान्याला इतरत्र हलविण्याचे औचित्य जिल्हा प्रशासनाने न दाखविल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे खराब धान्य इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भंडारा शहरात सामान्य रुग्णालयाच्या बाजूला शासकीय धान्य गोदाम असून स्वस्त धान्य वितरक योजनेत अंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ह्या गोदामातून मालाचा पुरवठा केला जातो. मागील वर्षी भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुरात गोदामाच्यावर 5 फुट पाणी असल्याने अक्षरक्षः हे धान्य पूर्णता पाण्याखाली बुडाले होते, त्यामुळे सलग 10 दिवस पुराच्या पाण्यात धान्य राहिल्याने हजारो क्विंटल गहु यात खराब झाला. यात शासनाचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. यातील खराब गहु हा गोदामातून काढून गोदाम परिसरात उघड्यावर टाकून दिल्याने महापुरात खराब झालेला गहु एक वर्ष कालावधी लोटला तरी तिथेच पडून असल्याने आता त्यावर अळ्या लागल्या असून कुजल्याने परिसारत असह्य दुर्गंधी पसरली आहे.