सुधाकर श्रीरामे
प्रतिनिधी नागभिड.
नागभिड _नवखडा गावाला पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक योजना नगर परिषद आस्थापित झाल्यानंतर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल असे वाटत नव्हते.मात्र,नगर परिषद प्रशासन असतानाचा ग्रहण लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नागभिड शहरासह १३ गावाला पाणी पुरवठा योजना ही ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सुरू होती. नगर परिषद स्थापित झाल्यानंतर पीण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यार असे प्रयत्नही सुरू आहेत.परंतछ तत्कालीन ९५/९६ सरकारने नागभिड-नवखडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू केली होती.
गेली २० वर्ष पुर्वी केलेली योजना आज घडीला सुरू आहे,पण १३ गावाला पाणी पुरवठा करण्याचा डोलारा नगर परिषद प्रशासन विभाग पेलावत नाही.याउलट नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने जुन्या योजनेकडे दुर्लक्ष केल जात आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी १३ गावांना भटकंती करावी लागत आहे.नागभिड/नावखडा ही दोन्ही गावे नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
तद्वतच अनेक गावे नगर परिषद क्षेत्रात येत नसल्याने तपाल योजनेच्या माध्यमातून ज्या गावांना पाणी पुरवठा होत आहे,त्यांना पिण्याचे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.नगर परिषद क्षेत्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे.तरी पण नवीन योजना कार्यान्वित करण्यात येण्यापूर्वी जुनी योजना कार्यान्वित ठेऊन जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावेत.तपाळ योजना ही १३ गावसाठी कार्यान्वित ठेवून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करावा असी मागणी नागरिकांची आहे.नागभिड येथे नगर परिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने अनेक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही.
त्यामुळे नाग भिडसह १३ गावातील लोकांना पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.