Thursday, April 18, 2024
Homeचंद्रपुरदारुबंदिची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा दारुबंदी उठवा

दारुबंदिची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा दारुबंदी उठवा


भद्रावती तालूक्यातील नगारीकांची मागणी अनेक युवक दारुतस्करीच्या व्यवसायात

भद्रावती: शहर तथा तालूक्यात व जिल्यात दारुबंदी असतांना सुध्दा दारुचा महापुर आला असुन दारुबंदीमुळे समाजातील स्वास्थ सुधारण्यापेक्षा ते अधीकाधिक बिघडत चालले आहे या अवैध व्यवसायात बेरोजगार युवक तथा शाळेकरी मुले गंुतले असुन त्यांचे भावी आयुष्य बरबाद होत आहे.

त्यामुळे जिल्हयातील दारुबंदी ही काटेकोरपणे राबवावी किंवा जिल्हयातील दारुबंदी उठवावी अषी मागणी भद्रावती तालूक्यातील नागरीक करीत आहे. जिल्यात दारुबंदी झाल्यानंतर जिल्यातील सामाजीक स्थिती सुधारेल अषी आषा होती मात्र ही आषा आता फोल ठरली आहे. दारु सुरु असतांना केवळ दारुच्या दुकानाच्या परिसरातीलच स्थिती खराब असायची मात्र दारुबंदि झाली आणी शहरात तथा तालूक्यातील प्रत्येक गावात गल्ली बोळात अवैध दारु विक्रिचे अनाधिकृत क्रेंद्र निर्माण झाले. या अवैध दारु विक्रेत्यावर पोलीस प्रषासनाचे वरदान असल्यामुळे हा अवैद्य व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. या व्यवसायात सहजपणे आणि भरपूर पैसा मीळत असल्याने अनेक तरुन, बेरोजगार युवक या अवैध धंदयाकडे आकर्षीत झाले. या व्यवसायापासून शाळकरी युवक सुध्दा सुटलेले नाही. याचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर होवून ते बरबाद होत आहे. गल्ली गोळात अनेक दारु तस्कर निर्माण झाल्यामुळे त्यांच्यात स्पर्धा निर्माण होवुन आपसी संघर्ष वाढत आहे. त्यामुळे शहर तथा तालूक्याचे सामाजिक स्वास्थ पूर्णपणे बिघडले आहे. दारुबंदिचा फटका केंद्राच्या स्वच्छता अभियानाला सुध्दा मोठया प्रमाणावर बसला असुन शहरातील खुले मैदान, सार्वजनिक शौचालय, गटारे व ईतर सार्वजनिक ठीकाणी दारुच्या रिकाम्या बाॅटल्स, चकण्याची रिकामी पाॅकीटे, पाण्याच्या रिकाम्या लाॅस्टीक बाॅटल्स यांचा खच पडलेला दिसत आहे. यातून शहरातील धार्मीक स्थळे व स्मषान भुम्या ही सुटलेल्या नाहीत त्यामुळे स्वच्छतेत आणखी अच्छतेची भर पडली आहे. शहरातील सफाई अभियानात दारुच्या रिकाम्या बाॅटला व ईतर सबंधीत वस्तुच जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे स्वच्छता अभीयानाचा पुरता फज्जा उडालेला आहे. या समस्येमुळे स्थानीक नगर पालीका प्रषासनही परेषान झाले आहे. दारुबंदीमुळे सर्वत्र दारु महाग झाली आहे त्यामुळे ही दारु परवडत नसल्यामुळे दारुडयांनी आपला मोर्चा गांजा, अफीम या सारख्या मादक द्रव्यांचा आसरा घेतल्यामुळे ते या अभद्र नषेच्या आहारी जाऊन आपले आरोग्य बिघडवित आहे. या व्यसनामुळे शहरात तथा तालूक्यात गांजा तथा अफीम विक्रेत्यांची संख्याही वाढलेली आहे. एकंदरीत दारुबंदिनंतर प्रष्न सुटण्याऐवजी ते आणखी चिघडत चाललेले आहे. त्यामुळे यावर तोडगा कढण्यासाठी एकतर जिल्हयातील दारुबंदी काटेकोरपणे अंमलात आणावी किंवा दारुबंदी उठवून अवैध दारुकेंद्र नष्ट करावी अषी मागणी भद्रावती शहर तथा तालूक्यातील नागरीक करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular