15 फरवरी 2021 रोजी होणार दारू बंदी उठविण्यावर राज्य सरकार कडे अहवाल सादर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील 1 एप्रिल 2015 रोजी दारू बंदी झाली त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात 300 करोड रुपयांची दारू जप्त करण्यात आली व लाखो अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वरती लाचलुचपत कार्यलय मार्फ़त कारवाई करण्यात आल्याने पोलीस प्रशासनावरती सर्वसामन्याकडून ताशेरे ओढण्यात आल्यावर चार दिवसा आधी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी पडोली पोलीस ठाणे क्षेत्रात दारू माफियांची एक पायलेट गाडी व सहा दारू भरलेली वाहने जप्त करून पडोली पोलीसांच्या स्वाधीन केली तर त्यापैकी दोन वाहने पसार झाल्याने पोलीस प्रशासन वरती आरोप करत आमदारांनी अनेक टीका पण केल्या असतांना पोलीस प्रशासन मध्ये मोठया हालचाली निर्माण झाल्या असून चंद्रपूर लोकल क्राइम च्या एका टीम नी शनिवारी रात्री पुसद हुन मूल ला जात असलेली ट्रक देशी दारूनी भरलेला पकडला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटावी म्हणून ना. विजय वडेट्टीवार यांनी युद्ध पातडीवर कार्य सुरु केले असून त्यांनी एक समिती गठित केली व राज्य सरकार ला चंद्रपूर जिल्हातील दारू उठवी म्हणून 15 फरवरी 2021 रोजी अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगितले असून आता दारू पिणाऱ्यांमध्ये आनंदाची लाट सुरु असून दुसरीकडे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भीती पाहवयास मिळत आहे तर त्यांनी आता कमी वेळात जास्त पैसे कमविण्यासाठी एका दारू बोटलीवर चकणा फ्री केल्याचे जिल्हातील अनेक तालुक्यात दिसून येत आहे.
नगरसेवक राष्टवादी कॉग्रेस पार्टी शहर अध्यक्ष
दीपक जयस्वाल
जेव्हा पासून जिल्ह्यात दारू बंदी झाली आहे तेव्हा पासून चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अवैध दारू विक्री करणारे सक्रिय झाले आहे त्यात आज पर्यत 300 कोटी रुपये किमतीची दारू पोलीस प्रशासनानी जप्त केली असून लाखो दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे चंद्रपूर जिल्ह्य हा औद्योगिक दृष्ट्या मोठा असून यामध्ये शासनाच्या महसूल बुडत असून व हा जिल्हा प्रदूषित जिल्हा म्हणून यांची एक वेगळी ओडख महराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात आहे तर या जिल्ह्याची दारू सुरु होने ही काळाची गरज आहे.