दररोज 1300 घरपोच भोजन पार्सल वाटप सुरु
आर्वी : अन्नछत्र” पुन्हा सुरु करून आर्वी शाहरतील परिसरातील 1300 चे वर अत्यंत गरजु नागरिकांची शाहनिशा करून यादी तैयार केली व त्यांना सकाळी 650 व संध्याकाळी 650 या प्रमाणे दररोज 1300 भोजन पार्सल अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घरपोच पोहोचविन्यात येत आहेत.

या मध्ये विशेषतः बँड वाद्य वाले, सायकल रिक्शा वाले, व इतर ज्यांचे व्यवसाय बंद आहे. त्यांचे करीता आमचे आर्वी अन्नछत्र सुरू या भूमिकेतुन ही भोजन पार्सल सुविधा सुरु करण्यात आलेली आहे.संपूर्ण भोजन पार्सल वाटप घरपोच पोहिचविण्यात येतात.
या वर्षी याप्रमाणे आज पर्यन्त एकूण 10 हज़ारचे वर या प्रचंड संख्येने भोजन पार्सल घरपोच पोहोचविण्या आले.
या कठीणवेळेस भोजन पार्सल रोजमजुरी करून पोट भरणाऱ्या गरजुना लाख मोलाचे ठरलेले आहे.
लॉक डाउन वाढल्या मुळे अटी व सर्थी शिथिल होऊन रोजगार सुरु होई पर्यन्त भोजन पार्सल “आर्वी अनछत्र” उपक्रम सुरूच राहणार असल्याचे गौरव जाजू यांनी सांगितले.
या उपक्रमा करीता गौरव जाजू मित्र परिवाराचे दर्शन पुरोहित,मोहन छंगाणी,अमन ठाकुर, दर्शन बोरगड़े,प्रथम बोरगड़े, सुमित सेलोकर, सर्वेश देशपांडे,आनन्द पालीवाल, मोहन शर्मा,चयन गहलोत, कृष्णा शर्मा,श्रवण मूधोलकर,मोहित कट्टा, हितेश कट्टा,मंगेश जोशी,पवन ढोले,बबलू शर्मा,सौरव सवाई,पंकज पंचकडे, विक्की रायकवार, सूरज माखीजा,गुड्डू ठाकुर,दिलीप राठी,अमन साहू,अर्पित खिलोसिया,आयुष पालीवाल,पीयूष पालीवाल,रमन अग्रवाल ,सवाल ठाकूर,भूषण पुसदकर,इत्यादि मोठ्या संख्येनी युवा परिश्रम घेत आहे.